_ap_ufes{"success":true,"siteUrl":"maharashtragr.com","urls":{"Home":"https://maharashtragr.com","Category":"https://maharashtragr.com/category/ads/","Archive":"https://maharashtragr.com/2024/05/","Post":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/","Page":"https://maharashtragr.com/news/","Attachment":"https://maharashtragr.com/mhgr-cji-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/mhgr_barandbench_2024-05_7c1b7d2a-75a6-4c0d-969b-a21eab60066e_supreme_court_of_india__web_page_1600x-1/","Nav_menu_item":"https://maharashtragr.com/home-2/","Oembed_cache":"https://maharashtragr.com/d8de8f75417a8210e93651381ed85c36/","Wp_global_styles":"https://maharashtragr.com/wp-global-styles-blogsite/","Amp_validated_url":"https://maharashtragr.com/amp_validated_url/f35a90d719157b161a99020d92fcac51/","Adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=adstxt&p=1086","App-adstxt":"https://maharashtragr.com/?post_type=app-adstxt&p=1084","Web-story":"https://maharashtragr.com/web-stories/romeo-and-juliet/"}}_ap_ufee न्यायवैद्यक – मृत्यूचिन्हे - MH General Resource न्यायवैद्यक – मृत्यूचिन्हे - MH General Resource

न्यायवैद्यक – मृत्यूचिन्हे

  1. मृत्यू : जीवशास्त्रीय प्रक्रिया
  2. सहानुभूतीने वागा

मृत्यू हा जीवनाचा शेवट आहे. वैद्यकीय उपायांनी तो आपण जास्तीत जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. प्राथमिक आरोग्याचे काम करताना कधीकधी मृत्यूप्रसंगात आपल्याला हजर राहण्याची वेळ येऊ शकते.मृत्यू होतो म्हणजे वैद्यकीय शास्त्रात नेमके काय होते, काय काय खाणाखुणा दिसतात हे आपण समजावून घेऊ या. प्रसंगी मनुष्य जिवंत आहे की मृत हे तपासून ठरवावे लागते. मृत्यू टाळण्यासाठी शक्य ते वैद्यकीय उपचारही करावे लागतात. या प्रसंगात नेमके काय करायचे हे माहीत पाहिजे.

Telegram Group Join Now

मृत्यू : जीवशास्त्रीय प्रक्रिया

वैद्यकीय शास्त्रानुसार मृत्यू म्हणजे हृदयक्रिया, श्वसनक्रिया व मेंदूचे कामकाज या तीन क्रिया बंद पडणे. यांपैकी एखादी आधी तर इतर दोन क्रिया लगेच नंतर बंद पडतात. हृदयक्रिया व श्वसनक्रिया या फार परस्परावलंबी असतात. त्यामुळे एक बंद झाली की लगोलग दुसरीही बंद पडते. यानंतर दोन-तीन मिनिटांत मेंदूही निष्क्रिय होतो. इथेच जीवन संपते. हृदयक्रिया तपासण्याचे सर्वात सोपे तंत्र म्हणजे नाडी तपासणे. अशा वेळी नाडी मनगटाऐवजी गळयामध्ये तपासावी म्हणजे निश्चित कळते. छातीवर हृदयाच्या जागी हात ठेवूनही धडधड कळू शकते. आवाजनळी असल्यास जास्त सोपे जाते. छातीची हालचाल पाहिल्यावर श्वसन चालू आहे की नाही हे कळते. पूर्वी नाकाशी सूत धरायची पध्दत होती (सुताची हवेच्या आतबाहेर येण्यामुळे हालचाल होते, श्वसन थांबल्यावर सूत हालायचे थांबते). आवाजनळीनेही श्वसनाचे आवाज तपासता येतात. मेंदू मृत झाल्याची सर्वात महत्त्वाची खूण म्हणजे दोन्ही डोळयांच्या बाहुल्या मोठया होणे (विस्फारणे) . टॉर्चचा प्रकाश टाकूनही या बाहुल्या नेहमीप्रमाणे लहान होत नाहीत. मृत्यूची ही अंतिम खूण आहे. या तीन महत्त्वाच्या घटनांपाठोपाठ नंतर हळूहळू इतर अनेक गोष्टी घडतात. स्नायू शिथिल होणे/ निर्जीव होणे, तपमान थंडावत जाणे, शरीर कडक होणे-ताठरणे इ.पण या सर्व मृत्यूनिदानाच्या दृष्टीने फारच उशिरा घडतात.

सहानुभूतीने वागा

वैद्यकीय दृष्टीने मृत्यू हा केवळ एका शरीराचा शेवट; पण मृत्यूला सामोरी जाणारी व्यक्ती, नातेवाईक, मित्र या सर्वांच्या दृष्टीने तो एका जीवनाचा शेवट असतो. मृत्यूभोवती मानवता, धर्म व संस्कृती यांची गुंफण आहे. सहानुभूतीने वागणे हे सगळयात महत्त्वाचे आहे. केवळ रुग्णाच्या दृष्टीने नाही तर आपले मन मोठे व्हावे म्हणूनही सहानुभूती महत्त्वाची असते. वैद्यकीय प्रगती झाल्यामुळे मृत्यू लांबवणे शक्य झाल्याने बहुतेक वेळा काही ना काही उपचार केले जातातच. खेडयात तर अशा वेळी फारच धावपळ होते. वाहने नसतात,जवळपास हॉस्पिटल नसते, आणि उपचार अपुरे असतात. त्यामुळे ब-याच वेळा गावातली मंडळी तुम्हांला बोलावतील. मृत्यू झालेला आहे की नाही ते कसे ठरवायचे हे पूर्वीच आपण शिकलो आहोत. मृत्यू अद्याप झालेला नसला तर रुग्णाचे प्राण वाचवण्याचे प्रथमोपचार करायला पाहिजेत. मात्र रुग्णालयात हलवायचे की काय याचा चटकन निर्णय घ्यायला पाहिजे. डॉक्टरांना बोलवायची पध्दत असली तरी बहुधा घरी त्यांना फारसे उपचार करता येत नाहीत. त्यापेक्षा रुग्णालयात हलवलेले चांगले. याबद्दल जे शक्य आणि लवकर होईल ते करावे. वैद्यकीय दृष्टया मृत्यू अटळ असेल तर त्या माणसाला सुखाने जाऊ देणे हे योग्य आहे.

Related Posts

CAA Act

MHGR| News Update| CAA कायदा काय म्हणतो?

CAA Act

LGBTQ

MHGR| समान विवाहासाठी भारतातील LGBTQ+ प्रचारकांसाठी लढा

LGBTQ+

ISM office V6

MHGR| ISM office V6 software download for Windows 10

ISM office V6

What is a Domicile Certificate in Marathi

What is a Domicile Certificate in Marathi : अधिवास प्रमाणपत्र हे अधिकृत दस्तऐवज आहे जे भारतातील विशिष्ट राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात एखाद्या व्यक्तीच्या निवासी स्थितीचे प्रमाणीकरण करते….

MHGR| महाराष्ट्र शासनाचा करार सूचीबद्ध आयटी कंपनी | Job Vacancy in Aksentt Tech in Mumbai

Government of Maharashtra Contract Listed Company: Aksentt Tech ही टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर सेवा प्रदाता आहे जी मोबाईल आणि फिक्स्ड टेलिकम्युनिकेशन नेटवर्क दोन्हीसाठी पायाभूत सुविधा रोलआउट सोल्यूशन्स ऑफर करते. सेवा…

MHGR| ई-पीक पहाणी प्रकल्प, महाराष्ट्र राज्य

आता पीक विमा आणि कृषी पतपुरवठा अधिक सुलभ होणार मोबाईलवरुन पीक पहाणी करणे आणि मार्गदर्शिका Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *